MPSC Language Paper Pattern – राज्यसेवा मुख्य परीक्षा : भाषा पेपर माहिती
MPSC Language Paper Pattern
MPSC Language Paper Pattern – Students Maharashtra Public Service Commission has decided the Format Of Language Paper in 2025, as Per this there will be Two Papers Namely Marathi and English (Combined) Conventional and Marathi and English (Combined) Objective in the main examination Of MPSC Rajyaseva. In this article, candidates will get All Detail Information regarding MPSC Language Paper, How To Prepare For MPSC Mains Language Paper. The MPSC Language Paper Pattern is divided into Conventional and Objective. The conventional paper is to be solved in three hours for 100 marks and the objective paper is to be solved in one hour for 100 marks. The difficulty level of conventional paper is that of higher secondary school examination whereas the difficulty level of objective paper is that of degree level. Check all information about MPSC Language Paper Pattern at below :
विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये भाषेच्या पेपरचे स्वरूप निश्चित केले आहे, त्यानुसार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत मराठी आणि इंग्रजी (एकत्रित) पारंपारिक आणि मराठी आणि इंग्रजी (एकत्रित) उद्देश असे दोन पेपर असतील. या लेखात, उमेदवारांना एमपीएससी भाषा पेपर, एमपीएससी मुख्य भाषा पेपरची तयारी कशी करावी यासंबंधी सर्व तपशीलवार माहिती मिळेल. MPSC भाषा पेपर पॅटर्न परंपरागत आणि वस्तुनिष्ठ मध्ये विभागलेला आहे. 100 गुणांसाठी पारंपारिक पेपर तीन तासात सोडवायचा आहे आणि 100 गुणांचा वस्तुनिष्ठ पेपर एका तासात सोडवायचा आहे. पारंपारिक पेपरची काठीण्य पातळी ही उच्च माध्यमिक शाळेच्या परीक्षेची असते तर वस्तुनिष्ठ पेपरची काठीण्य पातळी पदवी पातळीची असते. एमपीएससी भाषा पेपर पॅटर्नबद्दलची सर्व माहिती खाली तपासा.
भाषा विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचे प्रयोजन आधी समजून घ्यायला हवे. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून अंतर्गत व्यवहार आणि नागरिकांशी व्यवहार अशा दोन पातळय़ांवर महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात. त्यांचे आकलन आणि अभिव्यक्तीसाठी त्यांचा वापर करण्याची क्षमता या पेपर्सच्या माध्यमातून तपासली जाते. उमेदवाराची विचारप्रक्रिया, अभिव्यक्ती, लेखनाचे कौशल्य इ. गोष्टी जोखण्यासाठी पारंपरिक भाषा पेपरमध्ये निबंधाचा घटक योजण्यात आला आहे, तर उमेदवाराची आकलन क्षमता अभिवृत्ती, भाषिक कौशल्ये तपासण्यासाठी सारांश लेखन आणि भाषांतर या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
हा पेपर १०० गुणांचा असून, तो उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (१२वी) समकक्ष मानला जातो, असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या पेपरमधील मराठी आणि इंग्रजी भाषांसाठी वेगवेगळ्या उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहिण्याची आवश्यकता आहे. निबंधासाठी २५-२५ गुण, भाषांतरासाठी १५-१५ गुण, तर सारांश लेखनासाठी १०-१० गुण अशी प्रत्येक भाषेसाठी गुणवाटप करण्यात आले आहे.
निबंध:
- निबंध लेखन हा सर्वाधिक गुणांचा भाग आहे. दोन दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा, असे अभ्यासक्रमात नमूद आहे. निबंधाला थेट सुरुवात करण्याऐवजी कच्च्या पानावर आधी विषयाशी संबंधित मुद्दे लिहून त्यांची मांडणी करावी. त्या मुद्द्यांचा योग्य क्रम ठरवल्यानंतरच प्रत्यक्ष निबंध लेखनास सुरुवात करावी.
- जर विषय वैचारिक किंवा समस्याधारित असेल, तर त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि इतर संबंधित पैलूंचा समावेश करावा. साधारण १० ते १२ मुद्दे निवडून त्यांची सुसंगत मांडणी करणे उपयुक्त ठरते. सुरुवात परिणामकारक करण्यासाठी एखादा सुविचार, कविता किंवा वाक्याचा उपयोग करता येईल. निबंधाच्या मध्यभागी सर्व मुद्दे विस्ताराने मांडावेत आणि शेवटी निष्कर्षसहित समर्पक समारोप करावा.
- जर विषयाच्या दोन्ही बाजूंवर चर्चा करता आली, तर लेखन अधिक संतुलित व परिपूर्ण होते. मात्र, शेवट करताना मांडलेले निष्कर्ष एकतर्फी किंवा हटवादी वाटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- कल्पनात्मक निबंध लिहिताना कल्पनांचे भरकटलेले किंवा अतिशयोक्त स्वरूप टाळावे. विचारांमध्ये तर्कशुद्धता आणि सुसंगतता असावी. अशा प्रकारच्या निबंधात शालेय पद्धतीच्या मांडणीचा मोह होऊ शकतो, त्यामुळे लेखनामध्ये गंभीरतेची वाचकाला जाणवेल, याची काळजी घ्यावी.
भाषांतर:
- इंग्रजीमधून मराठीत भाषांतर करताना वाक्य रचना अयोग्य किंवा कृत्रिम होण्याचा धोका असतो. त्यामुळे वाक्य व्यवस्थित वाचून, त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या वाक्याचा योग्य भावार्थ मराठीत मांडावा. भाषांतर करताना वाक्य आधी मनातल्या मनातच मराठीत उच्चारले, तर योग्य शब्दांची निवड सोपी होते.
- इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील वाक्यरचना भिन्न असल्यामुळे भाषांतर करताना त्या फरकांची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. काही वेळा एखाद्या इंग्रजी शब्दाचा अचूक मराठी प्रतिशब्द आठवत नसल्यास, त्या शब्दावर अडकून राहण्याऐवजी वाक्याचा अर्थ समजून, तो भावार्थ योग्य प्रकारे मांडावा. मात्र, वारंवार लांबट किंवा विस्तारवादी अनुवाद टाळावा.
सारांश लेखन:
- सारांश लिहिताना दिलेल्या उताऱ्याची शब्दमर्यादा ओळखून, तो उतारा स्वतःच्या भाषेत संक्षेपाने मांडावा. उताऱ्यातील एकूण शब्दसंख्या सामान्यतः उजव्या कोपऱ्यात नमूद केलेली असते आणि त्यानुसार सारांश उताऱ्याच्या साधारण एकतृतीयांश शब्दांमध्ये बसवायचा असतो.
- उत्तरपत्रिकेत सारांशासाठी स्वतंत्र टेबल दिलेले असते. प्रत्येक चौकोनात फक्त एकच शब्द लिहायचा असल्यामुळे किती ओळींमध्ये सारांश पूर्ण होईल, हे अंदाज बांधता येते. पूर्ण उतारा वाचण्याऐवजी, प्रत्येक पॅराग्राफ वाचून त्याचा सारांश करत गेल्यास वेळेची बचत होते.
- सारांश लिहिताना उताऱ्यातील कोटेशन, उदाहरणे आणि इतर अनावश्यक तपशील टाळावे. त्यांच्या जागी त्यांचा अर्थ किंवा संदर्भ समजून संक्षेपाने मांडावा. उताऱ्यातील आशय केंद्रस्थानी ठेवत, कमीत कमी शब्दांत मुद्देसूदपणे सारांश लिहावा.
- सारांश लिहिताना स्वतःचे मत मांडणे टाळावे आणि दिलेल्या मुद्द्यांवर अतिरिक्त विवरण देण्याचे टाळावे. जर विचारले असेल, तर सारांशाला लहानशी, परंतु विषयानुरूप शीर्षक द्यावे.